📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 10, 2026
विश्वाचे आर्त

हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात शक्य

Violence can be overcome by non-violent means

धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे; पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली जात आहे, असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचंबैल केंसर । इया शंका ।। २४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – अथवा भ्रमर जसे कमळावर, कमळांतील बारीक तंतु चुरगळतील या शंकेने नाजूक रितीने पाय ठेवतात.

माणसांच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते. नव्या पिढीत अस्थिर मनामुळे हिंसेचे प्रमाण वाढत आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या हिंसक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. समाजातील असमानताही यासाठी तितकीच कारणीभूत आहे. असमानतेतून होणाऱ्या शोषणाने हिंसक वृत्ती बळावत आहे, पण या हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात करता येते. सात्त्विक विचारांची बैठक मनातील हिंसक प्रवृत्ती शांत करू शकते. यासाठी समाजात सात्त्विक वृत्ती वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे; पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली जात आहे, असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.

रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही, इतक्या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये ? यासाठी प्रयत्नच केला नाही, तर कसे शक्य होईल? भरकटलेली मने बदलायला हवीत. मने बदलूनच हिंसेवर विजय मिळवता येईल. भ्रष्टाचारी, गुंड वृत्तीच्या लोकांना शासन हे व्हायलाच हवे, पण त्याबरोबर त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्तीही नष्ट करायला हवी. मनातील दुष्ट विचार नाहीसे झाले, तर हिंसक घटना निश्चितच कमी होतील. समाजात सुख-शांती नांदेल.

साधनेसाठीही मन स्थिर असणे आवश्यक असते. अस्थिर मनाला अहिंसेच्या विचारांनी स्थिर करायला हवे. अहिंसेच्या विचार संस्कारामुळे मनातील हिंसकवृत्ती कमी होऊन मनातील राग, द्वेष दूर होतात. साधना करताना अनेक विचार मनात घोळत राहातात. अनेक शारीरिक अडचणी होत राहातात. त्रासाने मन अस्थिर होते. यावर अहिंसेच्या विचाराने याकडे पाहून विरोध न करता सहनशिलता ठेवून या त्रासाचा अनुभव घेऊन मन पुढे चालते ठेवावे. अशा अनुभुतीने मनात अहिंसेचा सात्विक विचार वाढून अध्यात्मिक प्रगती होत राहाते.

Related posts

आत्मज्ञानाचा एक सुंदर प्रवास ( एआयनिर्मित लेख )

अमृतात सुखाने अमर होणे म्हणजे काय ?

शिष्याच्या राजयोगातूनच गुरुंची संजीवन समाधी ii

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406