📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 12, 2026
काय चाललयं अवतीभवती

सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Call for submission of books for Sahyadri Sahitya Manch Award

सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सह्याद्री साहित्य मंच, ता. गगन बावडा, जि.कोल्हापूर यांच्यावतीने ग्रंथ पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती आनंद रंगराज व परशुराम कांबळे यांच्यावतीने देण्यात आली आहे.

सह्याद्री साहित्य मंचच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके २१ मार्च २०२४ पर्यत पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. सह्याद्री साहित्य मंचच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील साहित्यिकांकडून हे साहित्य मागविण्यात येत आहे. संस्थेमार्फत कावळटेककार अशोक पाटील पुरस्कार (कादंबरीसाठी), प्राचार्य जे. ए. साळोखे पुरस्कार (कथासंग्रहासाठी), कै.शोभा कांबळे पुरस्कार (कवितासंग्रहासाठी), लोकनेते बाळ पाटील पुरस्कार (प्रथम प्रकाशन पुस्तकासाठी) याबरोबरच वैचारिक / संशोधन, बालवाङ्मय पुरस्कारही देण्यात येणार आहेत.

इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती, फोटो आणि परिचय २१ मार्च २०२४ पर्यंत आनंद रंगराज, अध्यक्ष, सहयाद्री साहित्य मंच, ११५५/१, महालक्ष्मी कॉलनी, फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर. ४१६ ०९० या पत्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी कार्यवाह परशुराम कांबळे (पी.के.) ९३५६१९९०३८/९४२१२२७९८६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

 नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार – केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी

‘लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार २०२४ साठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406