!-- afp header code starts here -->
April 21, 2026
तानाजी धरणे – शेतकऱ्यांच्या वेदना कवितेत उतरवणारे कवी. नांगरतो तळहाताच्या रेषा या काव्यसंग्रहात समाजातील वेदना, संवेदना व आशेचा स्वर गुंजतो.
Home » तव्हा हंबरतील गायी
कविता शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तव्हा हंबरतील गायी

तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं मन हळवं असतं हे खरं आहे. धरणेच्या कविता अशाच समाजातील वेदनेला साद घालतात.

बाबाराव मडावी, आकांतकर

दूर कोणत्या महाली असेल तुझा मुक्काम
ही झोपडी बापाची तिची वाढव शान।

चंद्रमौळी झोपडीत तुझे सपान बिल्लोरी
तुझ्या जन्माचे आठव माझे पोसलेत उरी।

हे अंगण रुसलं तू जाता गं सासरी
नाही होणार सडा-रांगोळी नाही बजणार बासरी।

ती तुळस बघ नाही हसणार कालच्यावाणी
वाट बघल आई तिच्या लोचनात पाणी।

सण येता राखी पुनवचा दादा घेईल ग साडी
तुझ्यासाठी असेल ती त्याच्या काळजाची घडी।

वाट मोकळी दिसल तव्हा हंबरतील गायी
तिच्या पाडसात तुला रोज पाहते तुझी आई।

लेक चालते सासरी बाप रडतो धाई धाई
या कठोर पहाडाची होते क्षणातच राई।

तानाजी धरणे, महाड, रायगड

काव्यसंग्रह नांगरतो तळहाताच्या रेषा
कवी – तानाजी धरणे
प्रकाशक – ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक 2024
किंमत – १५० रुपये

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन

बार्शीचे एक रत्न…

कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!