April 29, 2026
साताऱ्यातील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय आयोजित उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभाची माहिती देणारे पोस्टर
Home » साताऱ्यातील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

साताऱ्यातील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

सातारा – येथील गुरुवार पेठेतील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ रविवारी, १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोमण सभागृह, अश्वमेघ अभ्यासिका, राजवाडा चौपाटी येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक शंकर निकम प्रमुख उपस्थितीत असून त्यांच्या हस्ते विविध साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षीचा ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नयन पऱ्हाड (शिरजगाव – भिकमराय) यांच्या ‘जिवी जे गुंतले’ या अभंग संग्रहाला जाहीर झाला आहे. तसेच सौ. सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार ऋषिकेश गोल्हार, (विठ्ठलनगर, पो. टाकळी) यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय उत्तेजनार्थ ग्रंथ पुरस्कार वैशाली मंडपे (सातारा) यांच्या ‘सायबरनामा’ आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या ग्रंथाला जाहीर झाला आहे.

कार्यक्रमात साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही लेखकांनाही प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. सौ. श्यामला माने, राजेंद्र घाडगे, सौ. मनीषा शिरटावले, अनिता आगाशे, अश्विनी कोठावळे, काशिनाथ गायकवाड आणि साक्षी महामुलकर यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले असून वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सौ. सुनीता उत्तेकर, सौ. सुनीता कदम, डॉ. सौ. नीला उत्तेकर, डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. राजेंद्र माने तसेच प्रा. सौ. प्रमोदिनी मंडपे आदी कार्यरत आहेत.

या समारंभाला सातारा शहर व परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक आणि ग्रंथालयाचे सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

गावाकडची गोष्ट…

एकता फाउंडेशनचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार जाहीर

जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाला विरोध कशासाठी ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!