📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 5, 2026
कविता

गुरु पौर्णिमा

Gurupournima poem by Sima Mangrule Tavte

प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरु
तोच वाहून नेतो शिष्याचे तारु…

गुरु रचतात जीवनाचा पाया
म्हणून तर शिष्याची उजळती काया..

गुरु देतात ज्ञान ,शिक्षण
शिष्यांचे होते म्हणून रक्षण…

गुरु रचतात भविष्याचा पाया
शिष्यांना मिळते आयुष्य भर छाया..

गुरुजी देतात संस्कार छान
त्यांच्यामुळेच समाजात मिळे मान…

गुरु शिष्यांना लावतात लळा
म्हणून फुलतो ज्ञानाच मळा…

गुरुजी शिकवतात परीस्थितीशी लढायला
कधीच आवडत नाही त्यांना शिष्यांनी रडायला….

गुरुजी आहेत माझा खरा आदर्श
त्यांचा आहे माझ्या जीवनाला स्पर्श…

गुरुजी म्हणजे,प्रेम वात्सल्य
त्यांच्या पुढे होई श्रमाचे साफल्य…

कवी – सीमा मंगरूळे तवटे, वडूज – सातारा

Related posts

कोजागिरीचं चादणं..

नाते

घराघरावर तिरंगा हा लावुया

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406