📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
काय चाललयं अवतीभवती

पुरस्कारसाठी कथासंग्रह, ललित साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Call for submission of short stories, fine literature works for award
  • मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कारसाठी कथासंग्रह, ललित साहित्यकृती पाठवा
  • 1 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली साहित्यकृती हवी
  • रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप
  • 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत साहित्यकृती पाठवावी

सोलापूर वडशिवणे, ता. करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार कथासंग्रह, ललित साहित्यकृतीस देण्यात येणार आहे. दत्तात्रय पिसाळ यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली. यावेळी प्रा. बाबुराव इंगळे, दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ हे उपस्थित होते.

पुरस्कारे हे तिसरे वर्ष असून या वर्षासाठी 1 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह, ललित साहित्यकृती मागवण्यात आले आहे. तरी साहित्यिकांनी प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती, अल्प परिचय, छायाचित्र 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाठवावेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यापूर्वी आबासाहेब पाटील, राजेंद्र भाग्यवंत, नागु वीरकर, मानसी चिटणीस या साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –

दत्तात्रय बबन पिसाळ, लॅनसेक्स इंडिया प्रा लिमिटेड,
अवश्या सी सी आय लॉजिस्टिक पार्क डॉक क्रमांक 60,
सर्व्ह क्रमांक.123, जुना मुंबई पुणे महामार्ग, पळस्पे फाटा,
कोळखेगाव, पनवेल 410206
अधिक माहितीसाठी संपर्क ९०९६७९९९०६

Related posts

उल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कार

त्रैमासिक वारूळ तर्फे साहित्य पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन अध्यक्षपदी नीरजा यांची निवड

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406