April 29, 2026
नवी मुंबई साहित्य रसिक संस्थेतर्फे कवी नारायण सुर्वे, बंधुता व समष्टी काव्य पुरस्कारासाठी आवाहन
Home » नवी मुंबई साहित्य रसिक संस्थेतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

नवी मुंबई साहित्य रसिक संस्थेतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन

कवी नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, बंधुता काव्य पुरस्कार आणि समष्टी काव्य पुरस्कारासाठी आवाहन

सर्वोत्कृष्ट कवितेसाठी 31 जानेवारीपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन

मुंबई – मराठी साहित्यात प्रतिष्ठित ठरलेल्या नवी मुंबई साहित्य रसिक संस्थेतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कवी नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, बंधुता काव्य पुरस्कार आणि समष्टी काव्य पुरस्कार असे तीन स्वतंत्र पुरस्कार सर्वोत्कृष्ट कवितेसाठी देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थही पारितोषिक देण्यात येणार आहेत.

मराठीतील उत्तम कविता शोधाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे नियम असे – कवी नारायण सुर्वे काव्य पुरस्कारासाठी दीड हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ, तर बंधुता पुरस्कारासाठी बाराशे रुपये स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ व समष्टी पुरस्कारासाठी एक हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यासाठी कवीने आपली एक उत्तम कविता 9321243925 या व्हाट्सअप नंबरवर 31 जानेवारी पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

मराठीतील ख्यातनाम लेखक कवींतर्फे पुरस्कार योजनेचे परीक्षण केले जाईल. त्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप राहणार नाही. तसेच परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. कविता पाठविताना विषयाचे बंधन नाही. प्रवेश फी 200 रुपये असून 8237364353 (नीलम शिर्के) या गुगल नंबर वर प्रवेश फी पाठवावी. प्रवेश फी मिळाली का याची खात्री करूनच कविता पाठवावी असे आवाहन करण्यात आले.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

रामदास फुटाणे यांनी राजकारणावरून विद्यार्थ्यांना दिला हा सल्ला

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीची साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

‘कोमसाप’चे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन यंदा मॉरिशसमध्ये

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!