fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 19, 2026
Home » शब्दांगण सांस्कृतिक चळवळीचे राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कारासाठी आवाहन
काय चाललयं अवतीभवती

शब्दांगण सांस्कृतिक चळवळीचे राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कारासाठी आवाहन

शब्दांगण सांस्कृतिक चळवळीचा राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार जाहीर. सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान प्रकाशित कादंबऱ्या पाठविण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025.

सांगली – शब्दांगण सांस्कृतिक चळवळ या वर्षापासून राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार सुरू करत आहे. हा पुरस्कार कादंबरी व कथा या दोन वाङ्मय प्रकारासाठी दरवर्षी आलटून पालटून दिला जाणार आहे. 2025 यावर्षीचा पुरस्कार कादंबरी या वाङ्मय प्रकारासाठी दिला जाणार आहे, अशी माहिती बाबासाहेब खांडेकर व सागर भोसले यांनी दिली आहे.

या कादंबरी पुरस्कारासाठी 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्या (पहिली आवृत्ती) विचारात घेतल्या जातील. पुरस्काराचे वितरण जानेवारी 2026 मध्ये समारंभपूर्वक केले जाईल. पुरस्कार वितरण सोहळा जाणीवपूर्वक इटकी ( ता. सांगोला ) या अत्यंत छोट्या गावामध्ये होणार आहे. इटकी गावचे प्रा. सिताराम सावंत यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जेथे फारसे वाङ्मयीन वातावरण नाही, अशा ठिकाणी वाङ्मयीन वातावरण रुजविण्याचा प्रयत्न करणे हेही शब्दांगण सांस्कृतिक चळवळीचे एक उद्दीष्ट आहे.

या पुरस्काराचे स्वरूप 10,001 रू रोख, 1000+ रु किमतीचे ग्रंथ, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. तरी साहित्यिकांनी १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी पुस्तके पाठवावीत असे आवाहन चळवळीच्यावतीने केले आहे.

साहित्य क्षेत्रातील जाणकार निवड समितीकडून या सर्वोत्कृष्ट कादंबरीची निवड केली जाईल. तरी लेखक व प्रकाशकांनी साहित्यकृतीच्या दोन प्रती, चिरायू नवजात शिशु व लहान मुलांचा दवाखाना, एसटी स्टँड जवळ, आटपाडी रोड, दिघंची, ता. आटपाडी. जिल्हा. सांगली. पिन 415315. या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन शब्दांगण सांस्कृतिक चळवळ व मौजे इटकी येथील ग्रामस्थानी केले आहे.

अधिक माहितीसाठी, बाबासाहेब खांडेकर मो. नं. 9923690280 व भोसले सागर मो. नं. 9763089497 याच्याशी संपर्क साधावा.

Related posts

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

समतेच्या विचाराचे छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ जनमानसात पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव

श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!