📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 12, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एसआयएसीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

SIAC Pune honored successful UPSC Civil Services and Indian Forest Service candidates in a grand ceremony led by Minister Chandrakant Patil.

लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील

पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये भारतीय नागरी सेवा तसेच भारतीय वनसेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम २६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

सन २०२५ मधील भारतीय नागरी सेवा परीक्षेत संस्थेच्या २५ विद्यार्थ्यांनी, तर भारतीय वनसेवा परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांच्या नेतृत्वामध्ये हे यश साकार झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवून समाजकल्याण व लोककल्याणाच्या उद्देशाने कार्य करावे, असे आवाहन केले. आपल्या कार्यातून लोकाभिमुख आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आज प्रशासन क्षेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी भविष्यात देशाचे प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यान्वित करत राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, डॉ. बोऱ्हाडे, सहसंचालक (पुणे), डॉ. राऊत, सहसंचालक (मुंबई) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पंचीकर यांनी केले.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळख असलेले डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. समाजकल्याण व लोककल्याणाचा दृष्टिकोन जोपासत आदर्श प्रशासन उभारण्यात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी पर्वात मिळालेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून, एसआयएसीची कामगिरी प्रशासकीय प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Related posts

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे लवकरच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुस्तकांचे गाव प्रमाणे इतिहास साक्षर गाव ही संकल्पना राबविण्याची गरज – प्रा. डॉ. राजा दीक्षित Dr Raja Dixit Historical Literacy Concept

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!