fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 12, 2026
Home » पावसाचा जोर काहीसा ओसरणार !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचा जोर काहीसा ओसरणार !

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरणार, तर कोकण-विदर्भात दसऱ्यानंतरही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम. शेतकामांना चालना मिळण्याची चिन्हे.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – पावसाची शक्यता, उघडीप याबद्दल काय सांगाल ?

माणिकराव खुळे – दसऱ्यानंतरच अपेक्षित उघडीप देण्याच्या शक्यतेंतला पाऊस,  मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ वगळता,  आजपासूनच, उर्वरित महाराष्ट्रातील  मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १८ जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेथे ह्या १८ जिल्ह्यात पूर्णतः नव्हे परंतु काहीशा उघडीपीची शक्यता असुन, केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचीच शक्यता सध्या जाणवते.
मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यात मात्र दसऱ्या नंतरही तेथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते.

प्रश्न – आगाऊ उघडीपीची शक्यता कश्यामुळे निर्माण झाली ?

माणिकराव खुळे – महाराष्ट्रावरून पाऊस पाडत सरकलेले हवेचे कमी दाब क्षेत्र आज सौराष्ट्रात पोहोचले असुन पुढील २४ तासात ते अरबी समुद्रात उतरून पुन्हा तीव्र कमी दाबात रूपांतर होवून ते ओमानकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.            

प्रश्न -परतीचा पाऊस देशात अजूनही जाग्यावरच स्थिर आहे का ?

माणिकराव खुळे – देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पर्यन्त, वेरावळ भरूच उज्जैन झाशी शहाजहाणपूर ह्या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर पुढील पाच दिवस अजूनही जाग्यावरच थबकण्याची शक्यता जाणवते.

प्रश्न – शेतकामांना चालना मिळू शकते काय ?

माणिकराव खुळे – उघडीपीच्या शक्यतेमुळे कांदा बियाणे टाकणी, खरीपातील मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग व अति आगाप धान सारख्या पीकांची काढणी, द्राक्षे-बाग छाटणी, वाफस्या नंतरच्या भाजीपाला पीक काढणी, हरभरा व ज्वारी पेरणी, रब्बीच्या पुढील इतर लागवडीसाठीची रानं तयार करणे, इत्यादीसारख्या शेतकामांचा शेतकामांना चालना मिळू शकते, असे वाटते. अर्थात हवामान विभागाच्या अंदाजाचा कानोसा घेऊनच निर्णय घ्यावा, असे वाटते
           
प्रश्न – कमी दाबाचा पट्टा कोठे राहील ?

माणिकराव खुळे – अंदमानजवळील कमी दाबक्षेत्र वायव्येकडे सरकणार. मंगळवार दि. ३० सप्टेंबर दरम्यान अंदमानजवळ बंगालच्या उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती व त्यानंतर त्याचे  उत्तर व उत्तर मध्य भारताकडे त्याच्या मार्गक्रमणाच्या शक्यतेतून महाराष्ट्रात दि. ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यानच्या झोडापण्या स्वरूपाच्या रब्बी पावसाच्या चौथ्या आवर्तनाचा अपेक्षित धोका सध्या तरी कमी होईल, असे वाटते.     

Related posts

वनस्पतीमधील लोह कमतरतेबाबत…

ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी

Photos : महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!