fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 6, 2026
Home » मान्सून परतणार, पण काही दिवस जागेवरच खिळणार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सून परतणार, पण काही दिवस जागेवरच खिळणार

Monsoon will return but will stay in place for a few days

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495

                १-परतीचा पाऊस
अति वायव्य राजस्थान, व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व इतर काही वातावरणीय बदलानुसार,सोमवार दि. २३ सप्टेंबर पासून. मान्सून परतण्याची शक्यता जाणवते. मान्सूनने जरी तोंड फिरवले तरी इतर काही वातावरणीय घडामोडीतून तो सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

                २- मध्यम पाऊस –
सप्टेंबर २१ ते २४ च्या दुसऱ्या आवर्तनातील पावसाची सुरवात प्रथमत: विदर्भात जोरदारपणे व त्या नंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, खान्देश व नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ हलक्या पावसाने सुरवात होण्याची शक्यता जाणवते.

              ३-जोरदार पाऊस –
सप्टेंबर २६ ते २९ दरम्यानच्या च्या तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसात मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर, नगर, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार अति जोतदार पावसाची शक्यता जाणवते. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

              ४-अतिजोरदार पाऊस –
त्यातही २६, २७ ला खान्देश नाशिक छ.सं.नगर व सभोंवतलातील परिसरात व २८, २९ ला मुंबई सह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
               

  ५-पूर- पाणी –
                ह्याचं चार(२६ ते २९) दिवसात नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर- पाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आजपासुन पाच दिवस शक्य तेवढ्या शेतमशागती व खरीप पीक काढणी कामाचा उरक व्हावा, असेही वाटते.

Related posts

आदिवासींची शेती

Neettu Talks : केळी खाण्याचे फायदे…

कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ, आत्मभान देणारी कविता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!