गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून मागील वर्षी ३६ साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी दिली आहे.
या राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कारासाठी २०२५ साठी खालीलप्रमाणे साहित्य मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्वीकारले जाईल. तर २०२४ च्या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य स्वीकारले जाणार आहे. तरी इच्छुकांनी कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव पाठवावेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय, प्रस्ताव ३० जून २०२५ पर्यंत केवळ पोस्टानेच पाठवावेत.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
चुडाराम बल्हारपुरे (नाटककार),
महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं.१७, राधे बिल्डिंगच्या मागे, चामोर्शी रोड,
गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), संपर्क क्रमांक. ९६२३६६३४३५
