📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

State-Level Mahamrityunjay Literary Competition 2024-2025 Call for Proposals

गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून मागील वर्षी ३६ साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी दिली आहे.

या राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कारासाठी २०२५ साठी खालीलप्रमाणे साहित्य मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्वीकारले जाईल. तर २०२४ च्या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य स्वीकारले जाणार आहे. तरी इच्छुकांनी कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव पाठवावेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्पपरिचय, प्रस्ताव ३० जून २०२५ पर्यंत केवळ पोस्टानेच पाठवावेत.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –

चुडाराम बल्हारपुरे (नाटककार),
महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं.१७, राधे बिल्डिंगच्या मागे, चामोर्शी रोड,
गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), संपर्क क्रमांक. ९६२३६६३४३५

Related posts

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

रायगडमधील एलिफंटा गुंफाचा वारसास्थळ दत्तक योजनेत समावेश

डॉ.भाऊसाहेब मिस्तरी यांच्या रंधा कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406