April 6, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Vadshivane Gavgada Sahitya award Marathi Literature
Home » गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२ या कालखंडासाठी देण्यात येणारे गावगाडा साहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी जाहीर केले. या पुरस्काराचे हे १२ वे वर्ष आहे.

गावागाडा साहित्य पुरस्कार डॉ. कालिदास शिंदे ( मुंबई ) यांच्या झोळी या आत्मचरित्रास व बाबुराव इंगळे ( सोलापूर ) यांच्या ” बेनितुरेच्या काठावर ‘याआत्मचरित्रास विभागूण देण्यात आला आहे.

देविदास मरीप्पा पोळके स्मृति पुरस्कार धम्मसंगिनी रमागोरख ( नागपूर ) यांच्या ‘स्त्रीवादी आंबेडकरवाद ‘ या समीक्षा ग्रंथास व डॉ. सुनीता चव्हाण ( मुंबई ) यांच्या भयातून निर्भयाकडे या कथासंग्रहास देण्यात आला आहे.

रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृति पुरस्कार सौ. मेघा पाटील ( सांगली ) यांच्या “सुलवान ” या कादंबरीस देण्यात आला आहे. रत्नमाला बबन पिसाळ स्मृति पुरस्कार आबासाहेब पाटील (कर्नाटक) यांच्या घामाची ओल धरून या कवितासंग्रहास व राजेंद्र भाग्यवंत ( करमाळा ) यांच्या ‘मी गुरुजी झालो त्याची गोष्ट ‘ या आत्मचारित्रात्मक लेखास देण्यात आला आहे.

गावागाडा क्रीडा पुरस्कार ऋतुजा चंद्रकांत साळुंके ( सातोली) – थाळीफेकसाठी तर राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार (करमाळा ) हिला मल्लखांब / योगा यासाठी देण्यात आला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, रोख रक्कम असे आहे. पार्थ पोळके, डॉ. जनार्धन भोसले, दत्तात्रय पिसाळ, प्रा. डॉ. संजय चौधरी, डॉ. मच्छिंद्र नांगरे, हरिभाऊ हिरडे, प्रज्ञा दिक्षीत, प्रा. संतोष साळुंके, लक्ष्मण जगदाळे, श्रीकृष्ण जगदाळे, हरिशचंद्र साळुंके यांनी साहित्य कलाकृती पुरस्कार निवडीचे काम पाहिले.

Related posts

तीर्थक्षेत्रास इतके महत्त्व का?

संसदीय कामकाजावर आघात

इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!