March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
About the book Ol Anmol Awanol
Home » ओल अनमोल आवानओल ग्रंथाविषयी…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओल अनमोल आवानओल ग्रंथाविषयी…

‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथाविषयी

अजय कांडर १९९० च्या पिढीतील महत्त्वाचे कवी. त्यांच्या ‘आवानओल’ या कवितासंग्रहातील कविता कृषिजन संस्कृतीतील बायांच्या भोगवट्याची वेदना – दुःख, भावविश्व मांडते आणि स्त्रीच्या मानसिक व शारीरिक आंदोलनाची विविध रूपे सूक्ष्मपणे सघनतेने उलगडत नेते. शेती-मातीशी जोडल्या गेलेल्या स्त्रीच्या कष्टप्रद जीवनातील ताणेबाणे समर्थपणे व्यक्त करताना स्त्रीची असीम वेदना अत्यंत संयत तरीही सखोलपणे “आवानओल” मधून व्यक्त झाली आहे.

मराठी कवितेत आजवर एकूण झालेल्या स्त्रीचित्रणात नवे अलक्षित व महत्त्वपूर्ण भर घालणारे हे चित्रण ठरते. त्यातून कांडर यांच्या मराठी कवितेतील काव्य लेखनाचा स्वतंत्र चेहरा प्रकट होतो. लोकपरंपरेजवळ जाणारी चित्रमय शैली आणि मीताक्षरी सामर्थ्य असणारी ही कविता आहे. बदलत्या ग्रामीण वास्तवाची अनेक रूपे रेखाटताना हा कवी वाचकाला अंतर्मुख करतो; हे या कवितेचे मोठे वैशिष्ट्य आहे.

या पार्श्वभूमीवर ‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथामधील लेखन या सगळ्याची नेमकेपणाने चर्चा आणि चिकित्सा करते. मराठी कवितेच्या नव्या अभ्यासकांना, संशोधकांना हा ग्रंथ त्यांच्या अभ्यासाची दिशा ठरवायला पुरेसा उपयुक्त असून वाचकही त्याचे स्वागत करतील, असा विश्वास वाटतो !

पुस्तकाचे नाव – ओल अनमोल आवानओल (अजय कांडर यांच्या कवितेची चर्चा आणि समीक्षा)
संपादक – शरयू आसोलकर
प्रकाशन – अक्षरवाड:मय प्रकाशन, पुणे
पाने – १४३, किंमत – २०० ₹

अजय कांडर यांचा युगानु युगे तूच खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/3K8FSbw

Related posts

शेतकऱ्यांसाठी खुषखबर ! सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

छगन भुजबळ यांचे तिसरे बंड…

वायुरुपी श्री गुरुदेवाचा जयजयकार

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!