April 29, 2026
Beautiful nature of vidharbha promotes tourism Nitin gadkari comment
Home » निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटनक्षेत्राची ताकद
पर्यटन शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटनक्षेत्राची ताकद

राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त वनसंपदा तसेच निसर्ग संपदा ही विदर्भाच्या पर्यटन क्षेत्राची ताकद – केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

नागपूर – राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त वनसंपदा तसेच निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. विदर्भात खाण पर्यटन , जल पर्यटनास प्रोत्साहन देण्याचीही गरज केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात व्यक्त केली. मध्य भारतातील वैदर्भीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थात वेदतर्फे आज लक्ष्मीनगरातील हॉटेल अशोकामध्ये ‘अमेझिंग विदर्भ-सेंट्रल इंडिया टूरिझम’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मिहानमध्ये 68 हजार युवकांना रोजगार मिळाला असून, विकास वेगाने सुरू आहे. संत्री आणि वाघ ही विदर्भाची जगभरातील ओळख आधीपासूनच आहे. पायाभूत सुविधा निर्माण करताना दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता ठेवायला हवी. विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रात माेठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असं आवाहन  गडकरी यांनी यावेळी केले.

या चर्चासत्रात विदर्भ व मध्य भारतातील पर्यावरणाच्या संधींवर चर्चा झाली . याप्रसंगी  महाराष्ट्र पर्यटन विभागाचे  प्रादेशिक उपसंचालक प्रशांत सवाई, यांनी महाराष्ट्र पर्यटन धोरण – 2024 ची माहिती उपस्थितांना दिली. वेदच्या अध्यक्षा रिना सिन्हा  यांनी वेद सारख्या संस्थांना पर्यटन धोरणात सहभागी करून घेण्यासाठी तसेच पर्यटनाच्या वाढीसाठी   प्रसारमाध्यमांद्वारे प्रोत्साहन द्यावे  अशा सुचना यावेळी मांडल्या. 

या कार्यक्रमादरम्यान  वेद व आनंद राठी यांच्या वतीने तयार करण्यात आलेला ‘प्रमोशन ऑफ विदर्भ टूरिझम’ या अभ्यासपूर्ण अहवालाचे प्रकाशन गडकरींच्या हस्ते  करण्यात आले . या चर्चासत्रात पर्यटन क्षेत्रातील भागधारक उद्योजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

जाणून घ्या पृथ्वीच्या दक्षिण टोकाचे शेवटचे गाव…

भारतातील वन आच्छादनात 5516 चौरस किमीने वाढ

एफआरपी वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या किमतींमध्ये समतुल्य वाढ करण्याची तातडीची गरज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!