📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 22, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वनराई बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतिमा इंगोले

Senior writer Dr. Pratima Ingole appointed as President of Vanrai State-Level Children’s Literature Conference in Akola

अकोला – माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया जन्मशताब्दीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे १८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे, संमेलनाचे संयोजक बबन कानकिरड व गजानन चौधरी यांनी ही माहिती दिली.

प्रा. प्रतिमा इंगोले यांची पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी चित्तथरारक रोमहर्षक व जीवनदायी कुमारकादंबरी ‘पुराच्या वेढ्यात अभय’ ही लोकप्रिय ठरली आहे. स्वप्नातील राजा, बोरवली बाई ह्या कादंबऱ्यासह लाजाळू, सोन्याचा बाळ, माध्यम, बापू गुरुजी, मोठं व्हायचं कसं ?, नवी बडबड गीते, उजळ आजोबा, खरा निवाडा, दृष्ट या बालवाङयासह ‘संख्यांच्या गोष्टी ‘ इत्यादी बालकथा संग्रह प्रकाशित झाले आहे. याशिवाय त्यांनी ‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास हा संशोधन पर संदर्भ ग्रंथ लिहिला आहे. त्यांच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक ललित लेख, वैचारिक लेख, संशोधन पर लेख, समीक्षा लेखन, भाषाशास्त्र विषयक लेखन प्रसिद्ध आहे.

वनराई युथ फाऊंडेशन अकोल्याच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीवजागृती, निसर्गप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. इंगोले यांच्या पर्यावरणविषयक बाल वाङ्मयाची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये सदस्य अमित वाडेकर, मधुभाऊ घारड, डॉ. विजय निलावार, डॉ. रावसाहेब काळे, प्रा. प्रवीण वाघमारे, प्रा. गजानन वाघ, डॉ. ज्योत्स्ना कानकिरड, अॅड. अंजली हिवाळे. डॉ. किरण वाघमारे, ज्ञानेश्वर मांडेकर यांचा समावेश होता.

Related posts

नायट्रोजनचे प्रमाण घटतेय ! व्यापक धोरणाची गरज

बाईल गेली अन् झोपा केला’: महाराष्ट्रातील नद्यांवर उशिरा आलेलं शहाणपण

काय प्रकल्प प्रकल्प करत बसलाय ! पर्यटन एके पर्यटन करा !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!