May 12, 2026
Dr. Sunil Sawant to be honored with Kavya Gaurav Award on stage at Ravindra Natya Mandir during a literary event
Home » डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई – ठाणे येथील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. साहित्य क्षेत्रातील कविता प्रांतातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या ४१ व्या वर्धापन दिनी ( १० एप्रिल ) सायंकाळी सात वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सन २००७ मध्ये डॉ. सुनील सावंत यांच्या मराठी पाच काव्य संग्रहांवर आधारित डॉ. सुनील सावंत: कवी आणि कविता (समीक्षक : शामल वेचलेकर व बाळ राणे ) या समीक्षा ग्रंथाची निवड अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन येथे संदर्भ ग्रंथ म्हणून केली होती. त्या ग्रंथात डॉ. सुनील सावंत यांच्या “ज्वालामुखी, माझी वस्ती मी शोधतोय, मैत्रीण, स्वातंत्र्याची हाक व सूर्य दिसत राहील तोपर्यंत…” ह्या पाच काव्य संग्रहातील कवितांची समीक्षा आहे. दरवर्षी विविध भाषेतील ग्रंथांमधून संदर्भ ग्रंथ अमेरिकेतील लायब्ररीत निवडले जातात. २००७ मध्ये हा आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ. सावंत यांना मिळाला आहे.

डॉ. सावंत यांची मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेत एकूण २१ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित असून त्यात ५ मराठी काव्य संग्रह, २ मराठी कथा संग्रह, १ मराठी अनुवादित ललित लेख संग्रह, १ मराठी आध्यात्मिक पुस्तक, ४ मराठी संपादित काव्यसंग्रह, १ मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक, त्यांच्या ५ काव्य संग्रहातील मराठी कवितांवर आधारित १ समीक्षा ग्रंथ, १ मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ, १ हिंदी काव्य संग्रह, १ हिंदी आध्यात्मिक पुस्तक, १ हिंदी शोध ग्रंथ, १ इंग्लिश संपादित ललित पुस्तक व १ मराठी कादंबरीचा इंग्लिश भावानुवाद अशी पुस्तके प्रकाशित आहेत.

नोव्हेंबर २४ मध्ये त्यांच्या सूर्य दिसत राहील तोपर्यंत… या काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती डॉ. भालचंद्र मुणगेकर ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत – युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

जगाला जीवनशैली अन् चक्राकार अर्थव्यवस्थेवर चिंतन करावे लागेल – पीयूष गोयल

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!