नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्यसंमेलन संपन्न
प्रा. उन्मेष शेकडे यांच्या दहा काव्यसंग्रहाचे एकाचवेळी प्रकाशन
पुणे – नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरीच्या वतीने आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, पुणे येथे झाले. या दोन दिवसीय महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे , ज्येष्ठ कवी डॉ. शांताराम कारंडे (मुंबई), डॉ. अलका नाईक, राजेंद्र धावते, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, प्रा. सुरेखा कटारिया, कल्पना बंब आदी उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात काव्यग्रंथदिंडीने करण्यात आली तर वृक्ष पूजा करून व झाडाला पाणी घालून महाकाव्यसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. कारंडे यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी राज्य समन्वयक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले की , काव्य ही कवींच्या कल्पनाशक्तीची भाषा असते. तो कवितेच्या निर्मितीपूर्वीच आपल्या भावविश्वात वावरतो. एकंदरीत कवी हा शब्दरूप सृष्टीचा राजा असतो, असे ते म्हणाले.
काव्यमंचचे संस्थापक प्रा. राजेंद्र सोनवणे हे प्रास्ताविक करतांना म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार करून एक चांगल्या माणसांची मोठी चळवळ या माध्यमातून उभी राहिली याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष कवी म. भा. चव्हाण म्हणाले की, कविता म्हणजे एक आनंदाचं ठिकाण आहे. मनाला उभारी देणार माध्यम आहे. संस्थेने २५ वर्ष हा काव्याचा यज्ञ तेवत ठेवून समाजातील संवेदशीलता जपण्याचं काम केलं आहे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून संस्था काम करत आहे. संस्थेच्या विविध कार्यक्रमामुळे मराठी भाषेची अस्मिता जागृत ठेवण्याचं काम आणि मराठी भाषेची समृद्धता वाढवण्याचे काम या संस्थेने सातत्यपूर्ण केले आहे. या संस्थेला शासन दरबारी मान्यता देऊन ,तिच्या कार्याची दखल घेऊन ,संस्थेला भरीव अशा प्रकारचे सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.
दुस-या सत्रात कवींचे काव्यवाचन घेण्यात आले. यावेळी शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमास सुखदेव तात्या सोनवणे, श्रीकांत चौगुले, प्रा. तुकाराम पाटील, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अंजू सोनवणे, डॉ. अलका नाईक, वृषाली टाकळे आदी उपस्थित होते . यावेळी संमेलन स्मरणिका “काव्यातील नक्षत्र” प्रकाशित करण्यात आली. तसेच प्रा. उन्मेश शेकडे या कवीच्या एकाच वेळी दहा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच इतर आठ काव्यसंग्रहाचे सुद्धा प्रकाशित करण्यात आले. या संमेलनामध्ये सहभागी संपूर्ण कवींना भोजन ,निवास व्यवस्था ही विनामूल्य करण्यात आली होती. प्रत्येक सहभागी कवींना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र ,शाल,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
दोन दिवसांच्या संमेलनात पाच काव्य मैफल व दोन परिसंवाद झाले. समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये संमेलनाध्यक्ष म. भा. चव्हाण यांना संस्थेच्या वतीने गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, मानधन देऊन गौरवण्यात आले. समारोपीय कार्यक्रमास सुखदेव तात्या सोनवणे, श्रीकांत चौगुले, प्रीती सोनवणे, प्रा. तुकाराम पाटील, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अंजू सोनवणे, वृषाली टाकळे, डॉ. अलका नाईक उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष कवी म. भा. चव्हाण यांच्या हस्ते सहभागी झालेल्या कवी आणि कवयित्रींना गौरवचिन्ह ,सन्मानपत्र ,गुलाबपुष्प व शाल देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत घोडे, बालाजी थोरात, सुनिल बिराजदार, नवनाथ पोकळे, डॉ. गिरीश सकपाळ, बबन चव्हाण, दिगंबर वाघिरे, विनायक विधाटे, प्रणव रोकडे, सुहास जगताप, सचिन कुलकर्णी, डॉ. पांडुरंग भोसले, रूपाली भालेराव, दिव्या भोसले, नरेंद्रकुमार चव्हाण, ज्ञानल क्षेमकल्याणी, संतोष देशमुख, जुली यादव, सुरेश कंक, नरेंद्र कुमार चव्हाण , सतिश कांबळे, प्रमोद डोंगरदिवे, यशवंत गायकवाड, सुभाष चव्हाण, नितीन लोणारी, सलीम नायकोडी, राजू वानखेडे, दत्तात्रय गायकवाड, मुकुंद माने, प्रकाश दळवी, अक्षय पवार, विवेक कुलकर्णी, साईराजे सोनवणे, किरणताई मोरे, राधाताई वाघमारे, प्रकाश तेलंग, गणेश लखणे यांनी महाकाव्यसंमेलनाच्या संयोजनामध्ये सहभाग घेऊन यशस्वी केले.
