May 6, 2026
डॉ. दीपक पवार यांनी समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्व समाज जोडला जावा असे प्रतिपादन केले. भाषा संपली तर संस्कृतीही संपते, असा इशारा दिला.
Home » भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा – डॉ. दीपक पवार
काय चाललयं अवतीभवती

भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा – डॉ. दीपक पवार

समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ. दीपक पवार यांचे प्रतिपादन

कलमठ, जि. सिंधुदुर्ग – आपली भाषा संपली तर आपणही संपणार आहोत हे ज्यांना माहीत नाही तेच लोक भाषेच्या प्रश्नापासून दूर राहत आहेत. भाषा संपली तर साहित्य संपेलच परंतु आपल्या भाषेची संस्कृती संपून आपणही संपून जाऊ. यामुळे मराठी भाषेच्या प्रश्नाशी सर्व मराठी समाज जोडला जायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा अभ्यासक दीपक पवार यांनी येथे केले.

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था यांच्यावतीने वसई येथे यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले आहे. यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम कलमठ गोसावीवाडी अक्षय सभागृहामध्ये आयोजित केला होता. समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त, समीक्षक प्रा. संजीवनी पाटील यांच्या हस्ते प्रा. पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी भाषेच्या प्रश्नाशी सर्व साहित्यिकांनी जोडून घ्यायला हवे असेही आग्रहाने सांगितले.

यावेळी मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रा. प्रकाश परब, श्रीमती साधना, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर, ॲड. मेघना सावंत, हरिश्चंद्र भिसे, संजय तांबे, निशिगंधा गावकर, सुरेश पाटील, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.

समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ एक सकारात्मक सांस्कृतिक राजकारण करण्यासाठी साहित्य चळवळीचे काम करते. समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते आणि समाज,साहित्य भाषेची जोडला गेलेला असतो. त्यामुळे या वर्षाच्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक दीपक पवार यांची खास निवड करण्यात आली. त्यांनी गेली अनेक वर्ष भाषेविषयी केलेले काम अजोड असे आहे. अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे राहणे आणि त्यांचा सन्मान करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अशा सगळ्या चांगल्या लोकांची एक साखळी बनत गेली की समाजात एक दबाव गट निर्माण होतो आणि व्यवस्थेला हादराही देता येतो. या सगळ्याच पार्श्वभूमीवर दीपक पवार यांची समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली हे औचित्य पूर्णच आहे.

अजय कांडर

यावर्षीच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी दीपक पवार यांच नाव आमच्या संस्थेचे मार्गदर्शक अजय कांडर यांनी सुचवलं आणि आम्ही सगळ्यांनी त्याला अनुमती दिली. कारण दीपक पवार यांचं भाषेविषयीच काम असा गौरव करणारेच आहे. त्यामुळे त्यांचा इथे येथोचित सत्कार करता आम्हाला आनंदच होत आहे.

संजीवनी पाटील

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

गाईच्या शेणापासून उत्पादित विषाणूरोधी घटक रोखते वस्त्रावर विषाणूंची वाढ

चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रफुल्ल शिलेदार

यंदा उसाचे 465.05 दशलक्ष टन इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!