fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 20, 2026
Home » शाश्वत शेतीचा समृध्द वारसा : डॉ. एम एस स्वामीनाथन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत शेतीचा समृध्द वारसा : डॉ. एम एस स्वामीनाथन

डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाश्वत शेती दिन साजरा. हरितक्रांतीचे जनक, उपासमारीविरुद्ध झुंजणारे मानवतावादी संशोधक म्हणून अभिवादन.

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांची आज १०० वी जयंती. डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे एक भारतीय कृषी, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ तसेच मानवतावादी शास्त्रज्ञ होते. ते भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते अर्थात कृषी परिवर्तनाचे शिल्पकार होत. कृषी क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने त्यांचा ७ ऑगस्ट हा जन्मदिवस सरकारने यापुढे दरवर्षी ‘शाश्वत शेती ‘ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्ताने…

डॉ नितीन बाबर
सहायक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग
श्री संपतराव माने महाविद्यालय खानापूर ता खानापुर जि सांगली ९७३०४७३१७३

एकंदरतिच कृषी, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासाच्या संदर्भातील त्यांच्या संशोधनाने पारंपारिक भारतीय शेतीव्यवस्था हरितक्रांतीतुन सदाहरित क्रांतीकडे मार्गक्रमन करते आहे. म्हणुन अशा या महान भुमिपुत्राचा जन्मदिवस शाश्वत शेती दिवस म्हणुन साजरा होतोय., ही बाब असंख्य शेतकरी, शेतमजुर, दूर्लक्षित, आदिवासी, कष्टकऱ्यांचा दृष्टीने नक्कीच सन्मानजनक म्हणावी लागेल.

हरितक्रांतीतुन अन्नधान्य स्वंयपूर्णता :

स्वामिनाथन यांचे पूर्ण नाव मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट ११२५ रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे झाला. १९४७ साली कोईमतूरच्या कृषी विद्यापीठातून स्वामिनाथन पहिला क्रमांक मिळवून कृषिपदवीधर झाले.नेदरलँडमध्ये अनुवंशशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेले. यानंतर त्यांनी केंब्रिजमधून पीएच डी केली.शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५४ मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. सन १९६० च्या दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. पीएल ४८० करारानुसार १९५५ मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला होता.एकेकाळी भारताला ‘जगातील भिकेचा कटोरा’ म्हटले जायचे. Ship to Mouth म्हणजे बंदरात अन्नधान्याची बोट लागली तरच घरातील चूल पेटायची, अशी भयानक अवस्था होती. त्यावेळी एम.एस. स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने उच्च पैदाशीचे बियाणे विकसित केले. गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे हरितक्रांती होवुन देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला.स्वामीनाथन यांच्या टिमने विकसित केलेल्या बीजांमुळेच आधुनिक शेती पद्धतींला चालना मिळाली. लाखो लोकांची उपासमारीतुन सुटका झाली., शिवाय भारत देश जगाचं धान्याचं कोठार बनला.

हरितक्रांतीतुन सदाहरित क्रांतीकडे :

आधुनिक कृषी पद्धती शेतीसाठी आधुनिक बी -बियाणे, खते,आणि कीटकनाशकांचा वापर , प्रगत सिंचन तंत्रे आणि शेतीचे यांत्रिकीकरण यातुन कृषी उत्पादनात क्रांती घडून आली. एकीकडे हरित क्रांतीने समग्र कृषी क्षेत्राचे परिवर्तन घडवून आणले तर दुसरीकडे शेतीतील खते, कीटकनाशके आणि सिंचणाचा अतिरेकी वापर शेतीत नवी आव्हाने निर्मान करणारा ठरला. त्यातुन जागतिक तापमानवाढ , प्रदूषण , जंगलतोड, हवामान बदल भूजलाचा ऱ्हास या साऱ्याचा परिणाम जैवविविधतेला बाधा पोहचली. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांना विचारात घेवून सदाहरित क्रांतीवर त्यांनी भर दिला. शेतीच्या दीर्घकालीन शाश्वत शेतीचा दृष्टिकोन जो कृषी उत्पादकता आणि पर्यावरणीय परिस्थितीशी संतूलन साधून शेती केली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. जमीन, हवा, पाणी या नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी प्रदुषन टाळून पर्यावरणाला हानी न पोहोचवता कृषी उत्पादकतेत सतत सुधारणा करण्याचे त्यांनी आवाहन केले. जैवविविधतेचे जतन, पर्यावरणाचे रक्षण आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्केपेक्षा अधिक भाव :

डॉ. स्वामीनाथन यांनी देशभरातील कृषी ग्रामीन अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात मोलाच भूमिका बजावली आहे. देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम तरच देश समृद्ध होईल., कृषी ग्रामीन अर्थव्यवस्थेचा समावेशक विकास होईल असे त्यांचे मत होते. याची प्रचिती २००४च्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेल्या अहवालातून येते. या आयोगाने पाच अहवाल सादर केले. संपुर्ण शेती क्षेत्रातील अडचणी विचारात घेत या अहवालाने अनेक महत्वपूर्ण शिफारशी केल्या. विविध पिकांसाठी किमान आधार किंमत (एमएसएपी ) निश्चित करण्यात या अहवालाने महत्त्वाची भूमिका बजावली. शेतकरी आत्महत्यांना तोंड देण्यासाठी एका व्यापक राष्ट्रीय धोरणाची शिफारस केली गेली. त्यातील अत्यंत जिव्हाळ्याची म्हणजे शेती उत्पादनाला उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त दर देण्याची शिफारस या अहवालात त्यांनी केली. परंतू दुर्दैवाने त्याच्या पश्चातदेखील या शिफारशीची परिपूर्णपणे आमंलबजावणी झाली नाही.

एकंदरितच त्यांच्या या कृषीतपस्वी व्यक्तिमत्वाची दखल त्यांना विविध पुरस्कार व सन्मान देऊन घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर शकडो पुरस्कार, अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय विद्यावाच्यस्पती पदव्या, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सन्मानीय सदस्यत्व, विविध आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय मंडळांचे अध्यक्षपद अशा असंख्य सन्मानांनी त्यांच्या कार्य-कर्तुत्व अलौकिक झाले आहे. भारत सरकारने १९६७ आणि १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले. टाईम या युरोपीय मासिकाने वीसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांपैकी एक म्हणून गौरविले आहे. भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये ‘भारतरत्न’ नागरी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, संयुक्त राष्ट्रांनी त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक असे गौरवले आहे. नुकतेच राज्य सरकारने यावर्षीच्या शाश्वत शेती दिनानिमित्त राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम एस स्वामीनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ स्थापन करण्याचे सुचित केले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे.

शाश्वत शेतीचा समृध्द वारसा

एम एस स्वामीनाथन त्यांना १९८७ मध्ये World Food Prize या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या बक्षीसातून मिळालेल्या निधीतून त्यांनी १९८८ मध्ये कृषी संशोधन आणि विकास यासाठी एमएस स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन (MSSRF) या संशोधन संस्थेची स्थापना केली. देशातील लोकांची अन्नसुरक्षितता सुस्थिर केल्यानंतर लोकांचे जीवनमान शाश्वतपणे सुधारले पाहिजे., या भूमिकेतुन ‘शाश्वत ग्रामीण विकासासाठी विज्ञान ‘ हे ब्रीद घेवुन अविरत ही संस्था कार्यरत आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून नवोपक्रम, शाश्वतता आणि ग्रामीन उपजीवीका सक्षमीकरणासाठी कृषी-अन्न प्रणाली, जैवविविधता व्यवस्थापन, किनारी आणि सागरी प्रणाली,अन्न आणि आरोग्य सुरक्षा, आर्थिक आणि पर्यावरणीय सुरक्षा आदी बाबींवर नेटाने काम सुरू आहे.

विशेषता महिलांना शेतीतील पिकांचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रशिक्षण महिला सक्षमीकरणास हातभार लावणारे ठरत आहे. गेल्या काही दशकांमध्ये लहान शेतकरी, मच्छीमार आणि आदिवासी लोकसंख्येचे जीवन आणि उपजीविका सुधारण्यास मदत झाली आहे., लाखो लोक उपासमारीतुन मुक्त झाले आहेत. एका अर्थाने ते गोरगरीब शेतकरी कृषीकष्टकऱ्यांच्या हक्कांचे आजीवन समर्थक आणि उपासमारीविरुद्ध लढणारे थोर मानवतावादी संशोधक होते म्हणावे लागेल. सद्यस्थितीत बदलते हवामान बदल, वाढते प्रदूषन, शेतीसमोरील नवनविन संकटे, बाजार अस्थिरता आणि नैसर्गिक संसाधनाची मर्यादित उपलब्धता याअनूषंगाने दिवसेंदिवस शाश्वत शेतीचे महत्व वाढतेय., अर्थात कृषी ग्रामीन अर्थव्यवस्थेच्या उपजीविका सुरक्षित करण्यासाठी स्वामीनाथन यांचा शाश्वत शेतीचा समृध्द वारसा वर्तमान तसेच भविष्यकालीन पिढ्यांनसाठी प्रेरणादायी तसेच दिशादर्शक ठरतो. अशा या थोर मानवतावादी कृषीशास्त्रज्ञाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Related posts

शिंगाडा…गुणी केवढा !

शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने जीएम पिकांना मान्यता द्यावी का ?

वणव्याबाबत गोवा सतर्क, केली ही उपाययोजना..

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!