📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 5, 2026
मुक्त संवाद

विविध विषयांना स्पर्श करणारा “मनातला गारवा “

Manatala Garva Book by Aparna Patil

कवयित्री अपर्णा पाटील यांच्या सार्‍या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे

इंद्रजीत देशमुख

“मनातला गारवा “हा काव्यसंग्रह कवयित्री सौ. अपर्णा पाटील यांच्या लेखणीतून उतरला आहे.
प्रेम काव्यात नात्यांची वीण, त्यातील ताण, विरह ,आठवणी ,यांचं सुरेख मिश्रण कवितांमधून टिपले आहे.
” मिळालं ते सगळं
अगदी भरभरून होतं
विसरण्यासाठी माझ्याकडे मात्र
यातलं काहीच नव्हतं “
ही कृतज्ञता आणि नात्यातील पूर्तता छान रेखाटली आहे .नात्यात गारवा असावा, जरी उलथापालथ झाली तरी ते कोरडे होऊ नये .नात्यातील ओलावा थंड करणारा आणि आयुष्य चिंब करणारा असावा अशी इच्छा कवयित्री करते.

देव, भक्ती, माणसातला देव या विषयांनाही या संग्रहात समावेश केला आहे. मंदिरातल्या देवाला प्रसन्न करण्या अगोदर माणसातला देव शोधला की देव पदाकडे वाटचाल सुखकर होते. माणसाच्या दुःखाची जाणीव ठेवून जो त्यांची दुःखे हलकी करतो तो माणसातला देव जाणतो आणि स्वतःही देवपणाला पोहोचतो.

निसर्गाविषयी लिहिताना श्रावणासोबत येणाऱ्या माहेरच्या आठवणी गावकुसातले ग्रामीण जीवनात पावसाचे असणारे अप्रूप या गोष्टी आणि निसर्गातील वारा पक्षी यांच्या आवाजाचे वर्णन ग्रामीण जीवनाची आठवण करून देते .समुद्र त्याचा असिम पसारा आणि त्यातील सांज सौंदर्य कवयित्रीला काव्य लिहायला प्रेरणा देते .धबधबा, पाऊस या निसर्गाच्या अविष्काराचे यथोचित वर्णन नेमक्या शब्दांमध्ये करून कविता निसर्गाचा स्पर्श मनाला करून देतात .निसर्गामध्ये मनातील मळभ शोषून घेण्याची ताकद आहे. या कविता वाचताना त्याची जाणीव होते.

कवयित्रीच्या सार्‍या कविता या प्रत्येक ओळीत तीन ते चार शब्दांत आशय व्यक्त करताहेत. विषयाचा आशय इतक्या कमी शब्दात व्यक्त करण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे. साऱ्या काव्यसंग्रहात अनेक विषयाला स्पर्श करून कवयित्रीने आपले विषय सामर्थ्य आणि लेखन सामर्थ्य प्रकट केले आहे.

पुस्तकाचे नाव – मनातील गारवा (कवितासंग्रह)
कवीअपर्णा पाटील
प्रकाशकसचिन पाटील,
किंमत – ७० रुपये

Related posts

गॅलिलिओ गेला । तुकोबाच्या भेटी ।

मित्रवर्य डाॅ. हरिश्चंद्र बोरकर आणि मी : एक पॅरेडाइम

संत तुकाराम अभंगः समाजव्यवस्थेतील घृणास्पद प्रदूषणांची हकालपट्टी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406