📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 3, 2026
काय चाललयं अवतीभवती

सोलापूरच्या निर्मला मठपती फाऊंडेशनतर्फे वाङ्मय पुरस्कार जाहीर

निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर तर्फे २०२५ सालचे वाङ्मय पुरस्कार जाहीर. कथा, कविता आणि बालसाहित्य या प्रकारातील साहित्यिकांचा गौरव.

सोलापूर : येथील निर्मला मठपती फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ साठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या तिन्ही प्रकारांमध्ये विजेत्यांची निवड परीक्षकांच्या निर्णयानुसार व विश्वस्त मंडळाच्या मान्यतेने करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यिक प्रतिसादाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शिवांजली स्वामी यांनी सर्व साहित्यप्रेमींचे आभार मानले आहेत.

🖋️ कथासंग्रह विभागात विजेते

प्रथम क्रमांक: “बयनामा” – लेखक बा. बा. कोटंबे, परभणी
द्वितीय क्रमांक: “बाभूळ फुले” – लेखिका प्रतिभा खैरनार, नांदगाव (जि. नाशिक)
विशेष पुरस्कार: “आहे कसा तो आननी” – लेखिका डॉ. गीता जोशी, सोलापूर

📖 कवितासंग्रह (प्रौढ वाङ्मय) विभाग

प्रथम क्रमांक: “सीसीटीव्हीच्या गर्द छायेत” – कवी गीतेश गजानन शिंदे, ठाणे
द्वितीय क्रमांक: “दिवस कातर होत जाताना” – कवी धर्मवीर पाटील, इस्लामपूर (जि. सांगली)
विशेष पुरस्कार: “अजान आणि चालीसा” – कवी मुबारक शेख, सोलापूर

👧 बालसाहित्य विभागात विजेते

प्रथम क्रमांक: “आगळ्या वेगळ्या कथा” – लेखक बबन शिंदे, कळमनुरी (जि. हिंगोली)
द्वितीय क्रमांक: “फुलांची शाळा” – कवयित्री प्रा. अलका सपकाळ, पाथरूड (जि. धाराशिव)
विशेष पुरस्कार: “माणुसकी” – लेखक अशोक खानापुरे, सोलापूर

या सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, शिवस्मारक, शिंदे चौक, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांनी सोलापूर तसेच राज्यभरातील उदयोन्मुख लेखकांना नवे व्यासपीठ मिळाल्याचे मानले जात आहे.

Related posts

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा

निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406