सोलापूर : येथील निर्मला मठपती फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ साठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या तिन्ही प्रकारांमध्ये विजेत्यांची निवड परीक्षकांच्या निर्णयानुसार व विश्वस्त मंडळाच्या मान्यतेने करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यिक प्रतिसादाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शिवांजली स्वामी यांनी सर्व साहित्यप्रेमींचे आभार मानले आहेत.
🖋️ कथासंग्रह विभागात विजेते
प्रथम क्रमांक: “बयनामा” – लेखक बा. बा. कोटंबे, परभणी
द्वितीय क्रमांक: “बाभूळ फुले” – लेखिका प्रतिभा खैरनार, नांदगाव (जि. नाशिक)
विशेष पुरस्कार: “आहे कसा तो आननी” – लेखिका डॉ. गीता जोशी, सोलापूर
📖 कवितासंग्रह (प्रौढ वाङ्मय) विभाग
प्रथम क्रमांक: “सीसीटीव्हीच्या गर्द छायेत” – कवी गीतेश गजानन शिंदे, ठाणे
द्वितीय क्रमांक: “दिवस कातर होत जाताना” – कवी धर्मवीर पाटील, इस्लामपूर (जि. सांगली)
विशेष पुरस्कार: “अजान आणि चालीसा” – कवी मुबारक शेख, सोलापूर
👧 बालसाहित्य विभागात विजेते
प्रथम क्रमांक: “आगळ्या वेगळ्या कथा” – लेखक बबन शिंदे, कळमनुरी (जि. हिंगोली)
द्वितीय क्रमांक: “फुलांची शाळा” – कवयित्री प्रा. अलका सपकाळ, पाथरूड (जि. धाराशिव)
विशेष पुरस्कार: “माणुसकी” – लेखक अशोक खानापुरे, सोलापूर
या सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, शिवस्मारक, शिंदे चौक, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांनी सोलापूर तसेच राज्यभरातील उदयोन्मुख लेखकांना नवे व्यासपीठ मिळाल्याचे मानले जात आहे.
